उध्दव ठाकरे यांच्याबद्दल बोलण्याची राधाकृष्ण विखे पाटील यांची औकात नाही; कुणाची टीका?
शरयू नदी पवित्र आहेच मात्र ज्यांनी गंगा मैली करून टाकली आहे. त्यामुळे हे लोक शरयु नदीत जातील किंवा गंगेत जातील काहीही फरक पडणार नाही, असं अंबादास दानवे म्हणाले आहेत.
छत्रपती संभाजीनगर : उध्दव ठाकरे यांच्याबद्दल बोलण्याची राधाकृष्ण विखे पाटील यांची औकात आहे काय?, असा सवाल विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनी विचारला आहे. शिवसेना प्रमुखांचा चोरलेला धनुष्यबाण घेऊन त्याचं पूजन करायला अयोध्येला चालले आहेत. याआधी उध्दवसाहेब अयोध्येत जाऊन आलेत. त्यांनी मंदिर फिर सरकार अशी घोषणा केली होती, त्यामुळे आता अयोध्येत जाण्यात कोणतंही मोठं काम नाही, असं अंबादास दानवे म्हणाले आहेत. अजित पवारांना काही प्रायव्हसी आहे की नाही? एखादी दिवस नॉट रिचेबल राहिले तर काय होतं का? वेगळं मत मांडलं म्हणून लगेच महाविकास आघाडीत मतभेद आहेत असं समजायचं कारण नाही, असंही दानवे म्हणाले आहेत. अंबादास दानवे छत्रपती संभाजीनगरमध्ये टीव्ही 9 मराठीशी बोलत होते.
मोदींच्या बचत मिशनला राज्याचा प्रतिसाद; फडणवीसांकडून काटकसरीचे आदेश...
मृतदेहाला पेटीत तरी ठेवा... अडीच महिन्याच्या नातीचा मृतदेह मांडीवर...
10 दिवसांच्या सस्पेन्सनंतर नाव फाइनल! कोण आहे केरळमच्या मुख्यमंत्री...
पंतप्रधानांच्या आवाहनाचे अनोखे स्वागत! महापौरांनी इलेक्ट्रिक बाईकने...

