AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Narayan Rane Live | मुख्यमंत्री आले आणि गेले, जिल्ह्याला काही दिलं नाही : नारायण राणे

Narayan Rane Live | मुख्यमंत्री आले आणि गेले, जिल्ह्याला काही दिलं नाही : नारायण राणे

| Edited By: | Updated on: Oct 09, 2021 | 3:56 PM
Share

 मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सिंधुदुर्ग दौऱ्यावरून केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी जोरदार टीका केली. मुख्यमंत्री पाहुण्यांसारखे आले आणि गेले. कोकणी माणसाला त्यांनी काहीच दिलं नाही, अशी टीका नारायण राणे यांनी केली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सिंधुदुर्ग दौऱ्यावरून केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी जोरदार टीका केली. मुख्यमंत्री पाहुण्यांसारखे आले आणि गेले. कोकणी माणसाला त्यांनी काहीच दिलं नाही, अशी टीका नारायण राणे यांनी केली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते चिपी विमानतळाचं लोकार्पण करण्यात आलं. त्यानंतर मीडियाशी संवाद साधताना नारायण राणेंनी ही टीका केली. चिपी विमानतळाचं श्रेय माझं नाही तर कुणाचं आहे? पाहुणे येतात आणि जातात. पाहुणे राहतात तरी. मात्र, पाहुण्यांपेक्षा मुख्यमंत्र्यांची भूमिका भयानक आहे. मुख्यमंत्री आले आणि गेले. काही संबंध नाही. विकासावर बोलले नाही. कोकणी माणसाला काही दिलं नाही. कोकणाने शिवसेना उभी करायला त्यांना मदत केली. पण शिवसेनेने कोकणी माणसाला काही दिलं नाही, अशी टीका राणेंनी केली.