Ajit Pawar : ठाकरे बंधूंच्या युतीवर दादा स्पष्टच म्हणाले, मी का नाक खुपसू! पण त्यांनी….
नागपूर येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिंतन शिबिरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीवर चर्चा केली. विदर्भातील निवडणुकीतील यश आणि राज्यातील सध्याच्या राजकीय समीकरणावर त्यांनी प्रकाश टाकला. त्यांनी शिवसेना बंधूंना शुभेच्छा दिल्या आणि नवीन पिढीच्या अपेक्षा समजून घेण्यावर भर दिला.
नागपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चिंतन शिबीर पार पडतंय. यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी टीव्ही ९ मराठीशी संवाद साधला. त्यांनी विदर्भातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांसाठी पक्षाच्या रणनीतीवर चर्चा केली. विधानसभा निवडणुकीत विदर्भात पक्षाचे सहा उमेदवार विजयी झाले असल्याचे त्यांनी नमूद केले. या निवडणुकीत विदर्भातील वातावरण पक्षासाठी अनुकूल असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शिबीरात वेगवेगळ्या वयोगटातील कार्यकर्त्यांसोबत विविध विषयांवर चर्चा झाल्याचे सांगितले. शहरीकरणाच्या वाढत्या प्रमाणातील समस्या आणि नवीन पिढीच्या अपेक्षा यांच्यावरील चर्चेचाही त्यांनी उल्लेख केला. राज्यातील सध्याच्या राजकीय समीकरण आणि ठाकरे बंधूंशी संबंधित प्रश्नांवर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. तर कुर्डू वादावर त्यांनी नो कॉमेंट अशी प्रतिक्रिया दिली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

