AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Abu Azmi : तुमचं अपयश लपवण्यासाठी कोणत्याही... अबू आझमी स्फोट प्रकरणावर नेमकं काय म्हणाले? कुणाकडे रोख?

Abu Azmi : तुमचं अपयश लपवण्यासाठी कोणत्याही… अबू आझमी स्फोट प्रकरणावर नेमकं काय म्हणाले? कुणाकडे रोख?

| Updated on: Nov 11, 2025 | 5:18 PM
Share

दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटाप्रकरणी अबू आझमी यांनी सुरक्षा आणि गुप्तचर विभागाचे अपयश अधोरेखित केले आहे. त्यांनी निष्पाप लोकांना अटक करण्याच्या प्रकारांवर तीव्र नाराजी व्यक्त करत, मुंबईतील ट्रेन स्फोटाचे उदाहरण दिले. दोषींना त्वरित शिक्षा व्हावी, पण निर्दोष व्यक्तींना लक्ष्य करू नये, अशी त्यांची मागणी आहे.

दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटावर समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी या घटनेला सुरक्षा आणि गुप्तचर विभागाचे मोठे अपयश म्हटले आहे. दिल्ली ही देशाची राजधानी असून, अशा ठिकाणी स्फोट होणे हे चिंताजनक आहे, असे आझमी यांनी म्हटले आहे.

गुन्हेगारांना सहा महिन्यांत फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी करत असतानाच, त्यांनी निर्दोष लोकांना खोट्या आरोपाखाली अटक करू नये, यावरही अबू आझमी यांनी भर दिला. मुंबईतील ट्रेन स्फोटात १८७ लोकांचा मृत्यू होऊनही दोषींना शिक्षा झाली नाही, उलट काही निर्दोष लोकांना १९ वर्षांपर्यंत तुरुंगात ठेवण्यात आले, असे त्यांनी सांगितले. न्यायालयात ते निर्दोष सिद्ध झाले. अशाप्रकारे आपल्या अपयशावर पांघरूण घालण्यासाठी कोणालाही विनाकारण त्रास देऊ नये, असे आझमी यांनी स्पष्ट केले.

Published on: Nov 11, 2025 05:18 PM