AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ठाकरे बंधू एकत्र येणं म्हणजे भीतीसंगम! फडणवीसांची टीका

ठाकरे बंधू एकत्र येणं म्हणजे भीतीसंगम! फडणवीसांची टीका

राखी राजपूत
राखी राजपूत | Updated on: Jan 14, 2026 | 4:03 PM
Share

देवेंद्र फडणवीस यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये महायुतीच्या मोठ्या विजयाचा विश्वास व्यक्त केला. ठाकरे बंधूंच्या एकजुटीला त्यांनी भीतीसंगम संबोधले. मराठी माणसाच्या विकासाची खरी व्याख्या त्यांनी समजावून सांगितली, तर अण्णामलाईंच्या बॉम्बे वक्तव्यावरही स्पष्टीकरण दिले. महायुतीने विकासाच्या मुद्द्यावरच निवडणूक लढवली असून, हिंदुत्व हा त्यांचा मूळ विचार असल्याचे त्यांनी नमूद केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आगामी महानगरपालिका निवडणुकांमध्ये महायुतीच्या विजयावर ठाम विश्वास व्यक्त केला. मुंबई, पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये महायुती चांगल्या प्रकारे जिंकेल, असा दावा त्यांनी केला. ठाकरे बंधू एकत्र येण्याला त्यांनी भीतीसंगम असे संबोधले, मात्र याचा राजकीय परिणाम होणार नाही असे ते म्हणा

फडणवीस यांनी मराठी विरुद्ध अमराठीच्या राजकारणावर टीका केली. मराठी माणसाचा विकास म्हणजे मुंबईतून पलायन करणे किंवा परप्रांतीयांना मारणे नव्हे, तर बीडीडी चाळींसारख्या ठिकाणी घरे उपलब्ध करून देणे, असे त्यांनी स्पष्ट केले. महायुतीने विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवली असून, ९० टक्के प्रचार हा विकासावर केंद्रित होता, असेही त्यांनी सांगितले.

अण्णामलाई यांच्या बॉम्बे वक्तव्यावरून निर्माण झालेल्या वादावर बोलताना, तो अपमान करण्याचा हेतू नसून जुनी सवय असल्याचे त्यांनी नमूद केले. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वभाषेचा अभिमान आणि इतर भारतीय भाषांचा सन्मान दोन्ही शिकवले असल्याचे ते म्हणाले.

Published on: Jan 14, 2026 04:03 PM