साहेब.. संसार पाण्यात गेला, ओला दुष्काळ जाहीर करा! लाडक्या बहिणीची शिंदेंकडे आर्त मागणी
धाराशिव जिल्ह्यातील पूरग्रस्तांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मदत मागितली आहे. शेतकऱ्यांचे संपूर्ण आयुष्य पाण्यात गेले असून, शेती, जनावरे आणि सर्वकाही नष्ट झाले आहे. महिला शेतकऱ्यांनी उपमुख्यमंत्री यांना दुष्काळ जाहीर करण्याची आणि मदत पुरवण्याची विनंती केली आहे.
धाराशिव जिल्ह्यातील भीषण पूर आणि पाणी साचल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेनंतर एका महिलेने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर आपली व्यथा मांडली. तीन तिच्या भाषणात म्हटले की, शेतकऱ्यांचे संपूर्ण आयुष्य पाण्यात गेले आहे. शेती, जनावरे आणि सर्वकाही नष्ट झाले आहे. तिने उपमुख्यमंत्र्यांना दुष्काळ जाहीर करण्याची आणि शेतकऱ्यांना तातडीची मदत पुरवण्याची विनंती केली. तिने हे देखील म्हटले की, या संकटात राजकारण बाजूला ठेवून जनतेसाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करावे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Published on: Sep 24, 2025 05:56 PM
Follow Us
Latest Videos
नागरिकांनो घाबरू नका, राज्यात गॅसचा तुटवडा नाही, भुजबळ यांनी थेट....
युद्धाचा परिणाम मुंबईतील ड्रायफ्रूट मार्केटवर, सुकामेव्याच्या दरात....
आखाती युद्धाचा फटका शेतकऱ्यांना, हळदीचे दर घसरले, शेतकरी अडचणीत
काँग्रेसने खोट्या रील्सची इंडस्ट्री सुरू केली– मोदींचा हल्लाबोल

