AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ganesh Naik : गणेश नाईकांचा जनता दरबार बंद होणार? शिंदेंच्या सेनेकडून कोर्टात याचिका, आरोप नेमका काय?

Ganesh Naik : गणेश नाईकांचा जनता दरबार बंद होणार? शिंदेंच्या सेनेकडून कोर्टात याचिका, आरोप नेमका काय?

| Updated on: Sep 19, 2025 | 4:58 PM
Share

शिंदे गटाने गणेश नाईकांच्या जनता दरबारावर मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. याचिकेत नाईकांच्या दरबारा दरम्यान पालिका आणि पोलीस प्रशासनाचे अधिकारी उपस्थित असल्याने जनतेच्या समस्यांचे निराकरण होत नाही, असा आरोप आहे.

शिंदे गटाने गणेश नाईकांच्या जनता दरबाराविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. शिंदे गटाचे किशोर पाटकर यांनी ही याचिका दाखल केली असून त्यात म्हटले आहे की, नाईकांच्या जनता दरबाराच्या वेळी पालिका आणि पोलीस प्रशासनाचे अधिकारी उपस्थित असतात तरीही जनतेच्या समस्या सोडवल्या जात नाहीत. याचिकेत जनता दरबारामुळे प्रशासनाचे कामकाज प्रभावित होते असा आरोप करण्यात आला आहे. गणेश नाईक यांनी यावर प्रतिक्रिया देताना असे म्हटले आहे की, जर कोणी याचिका दाखल केली असेल तर त्याबाबत त्यांना काही हरकत नाही. त्यांनी असेही स्पष्ट केले की, मंत्र्यांना जनतेच्या समस्या ऐकण्यासाठी संबंधित परिसरात जाऊन प्रशासकीय यंत्रणेच्या मदतीने त्या समस्या सोडवता येतात.

Published on: Sep 19, 2025 04:58 PM