AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विवाह सोहळ्यानंतर कुटुंबातील 17 जण पिकनीकला, भावाचा फोन आला, घाबरतच म्हणाला, मुलगी वाहून गेली आणि...

विवाह सोहळ्यानंतर कुटुंबातील 17 जण पिकनीकला, भावाचा फोन आला, घाबरतच म्हणाला, मुलगी वाहून गेली आणि…

| Updated on: Jul 01, 2024 | 2:18 PM
Share

अन्सारी आणि खान कुटुंबियांकडे 27 जून रोजी लग्न होते. त्यानंतर दोन दिवसानंतर वलिमाचा कार्यक्रम 29 तारखेला झाला. त्यानंतर 30 तारखेला या कुटुंबियाने लोणावळ्यात पिकनीकला जाण्याचा निर्णय घेतला. सकाळीच ते एका टेम्पो ट्रॅव्हलने निघाले. लोणावळ्यात 12 वाजता पोहचले. एकूण 17 जण लोणावळ्यात आले होते आणि...

लोणावळ्यातील भूशी डॅमला पिकनीकला गेलेल्या एका कुटुंबातील पाच व्यक्ती पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची घटना रविवारी दुपारी घडली. या घटनेतील पाच जणांपैकी महिला आणि दोन मुलींचा मृतदेह काल सापडला आहे. अन्सारी आणि खान कुटुंबियांकडे 27 जून रोजी लग्न होते. त्यानंतर दोन दिवसानंतर वलिमाचा कार्यक्रम 29 तारखेला झाला. त्यानंतर 30 तारखेला या कुटुंबियाने लोणावळ्यात पिकनीकला जाण्याचा निर्णय घेतला. सकाळीच ते एका टेम्पो ट्रॅव्हलने निघाले. लोणावळ्यात 12 वाजता पोहचले. एकूण 17 जण लोणावळ्यात आले होते, असे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले. त्यानंतर दुपारी दोन वाजता भावाचा फोन आला आणि तो प्रचंड घाबरलेला होता. त्याची मुलगी वाहून गेली. त्याच्या फोननंतर मी तातडीने निघालो आणि लोणावळ्यात आलो, असे पीडित कुटुंबियांच्या भावाने ‘टीव्ही 9 मराठी’ला सांगितले. अन्सारी कुटुंबातील पाच जण वाहून गेले. त्यापैकी तिघांचे मृतदेह काल सापडले. साहिस्ता नियकत अन्सारी ( वय 36), अमिमा आदिल अन्सारी ( वय 13) आणि उमेश आदिल अन्सारी ( वय 8 ) या तिघांचे मृतदेह काल सापडले. तर आज सकाळी एका नऊ वर्षांच्या मुलीचा मृतदेह शोध पथकाच्या हाती लागला. अद्याप एकाचा मृतदेह सापडलेला नाही, असेही पीडित कुटुंबियांच्या भावाने सांगितले.

Published on: Jul 01, 2024 02:16 PM