Amravati Violence | अमरावतीमधल्या दंगलीमागे नवाब मलिकांचा हात, हाजी अराफत यांचा गंभीर आरोप
अमरावतीमधील दंगलीमागे नवाब मलिक यांचा हात असल्याचा आरोप भाजप नेते हाजी अराफात यांनी केला आहे. मुंबईतून अमरावतीमध्ये पैसे पोहोचवण्याचं काम नवाब मलिकांनी केलं असल्याचाही आरोप हाजी अराफत शेख यांनी केला आहे
अमरावतीमधील दंगलीमागे नवाब मलिक यांचा हात असल्याचा आरोप भाजप नेते हाजी अराफात यांनी केला आहे. मुंबईतून अमरावतीमध्ये पैसे पोहोचवण्याचं काम नवाब मलिकांनी केलं असल्याचाही आरोप हाजी अराफत शेख यांनी केला आहे. नवाब मलिकांचे रझा अकादमीचे प्रमुख सईद नुरीसोबत जूने संबंध असून त्यांनीच ही दंगल घडवून आणली. जेव्हा जेव्हा एनसीपीचं सरकार आलं सईद नुरी बिळातून बाहेर येतो, भिवंडी, आझाद मैदान सगळ्या दंगलीत यांचंच नाव येतं. नवाब मलिकांकडे ठोस पुरावे आहेत का की हे भाजपचं काम आहे, असा सवाल हाजी अराफत यांनी केला आहे.
Follow Us
Latest Videos
शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज, पवारांची प्रकृती....
गिधाड धमक्या देऊ नका, तुम्ही संप पुकारलात तर आम्हीही रस्त्यावर उतरू...
बीड कारागृहातून धक्कादायक माहिती, आणखी एक ऑडिओ क्लिप समोर
गांधी हत्येचं मुनींकडून समर्थन, हर्षवर्धन सपकाळ भयंकर संतापले....

