अन् भर विधानसभेत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसमोर जोडले हात, नेमकं काय म्हणाले अजित पवार
VIDEO | शेतकरी जगला तर..., विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला
मुंबई : राज्यातील विविध भागात अवकाळी पावसाने चांगलाच हैदोस घातला आहे. या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या शेत पिकांचं मोठ नुकसान झालं आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळावी, याच मुद्द्यावरून विरोधकांना विधानसभेत सत्ताऱ्यांवर जोरदार निशाणा साधला. शेतकऱ्यांच्या नुकसानीचा मुद्दा गांभीर्याने घेण्याची गरज असल्याचे मत व्यक्त करत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारचे कान उघडले. शेतकरी जगला तर राज्य जगेल त्यामुळे सरकारने तसं काम करावे. अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान झाले या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी आक्रमक भूमिका घेत राज्यसरकावर चांगलाच हल्लाबोल केला. यावेळी शेतकऱ्यांचा मुद्दा मांडत अशताना अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर हात जोडले.
Latest Videos
Latest News