मुख्यमंत्री Uddhav Thackeray यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांनी लवकरच महाराष्ट्र (maharashtra) पिंजून काढण्याचे संकेत दिले आहेत. आपण शिवसंपर्क अभियान गेल्यावेळीच राबवणार होतो. पण कोरोनाची लाट आली. त्यानंतर माझ्या मानेचं दुखणं उद्बवलं.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांनी लवकरच महाराष्ट्र (maharashtra) पिंजून काढण्याचे संकेत दिले आहेत. आपण शिवसंपर्क अभियान गेल्यावेळीच राबवणार होतो. पण कोरोनाची लाट आली. त्यानंतर माझ्या मानेचं दुखणं उद्बवलं. मात्र आता आपल्याला जोमाने कामाला लागायचं आहे. येत्या काही दिवसात मीही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात दिसेल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं. शिवसेना खासदार आणि जिल्हाप्रमुखांशी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी हे विधान केल्याचं सूत्रांनी सांगितलं. तसेच मुख्यमंत्र्यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजपला घेरलं. भाजपचं (bjp) हिंदुत्व हे केवळ राजकारणासाठी आहे. सत्तेसाठी मेहबुबा मुफ्ती यांच्यासोबत गेले होते हे विसरलात का? असा सवाल करतानाच सरकारचा संबंध दाऊदशी जोडणं चुकीचं असून विरोधकांच्या कुरापती ओळखायला शिका असंही उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.
गणेश नाईक यांच्या आरोपांवर एकनाथ शिंदेंचे पहिल्यांदाच भाष्य, नेमकं काय
अजित पवार यांचं विमान पडलं, त्यानंतर पुन्हा 3 स्फोट? नेमकं काय घडलं?
जळालेल्या ब्लॅक बॉक्सचा डेटा परदेशात तपासणीसाठी पाठवण्याची शक्यता
DGCA चा प्राथमिक अहवाल तत्काळ जाहीर करा, रोहित पवारांची मागणी

