Imtiaz Jaleel : ठाकरे आजकाल खूप सेक्युलर, मुस्लमान म्हणतात ते चांगले, पण…. बाबरी मशीद मुद्द्यावरून जलील यांचा निशाणा
वाशिम नगर परिषद निवडणुकीच्या प्रचारसभेत इम्तियाज जलील यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. जलील यांनी उद्धव ठाकरेंच्या धर्मनिरपेक्ष भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, बाबरी मशीद विध्वंसात शिवसेनेच्या भूमिकेची आठवण करून दिली. मुस्लिम उमेदवारांनी ठाकरे यांच्यासोबत जाण्याबद्दल त्यांनी विचारणा केली. निवडणूक आयोगाकडून आपल्यावर पाळत ठेवल्याचा दावाही जलील यांनी यावेळी केला.
वाशिम नगर परिषद निवडणुकीच्या प्रचारसभेत एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर तीव्र शब्दांत हल्लाबोल केला. जलील यांनी उद्धव ठाकरे यांच्या धर्मनिरपेक्षतेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले की, “उद्धव ठाकरे आजकाल खूप सेक्युलर झाले आहेत.” जलील यांनी बाबरी मशीद विध्वंसाचा मुद्दा उपस्थित करत उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत केलेल्या एका विधानाचा उल्लेख केला.
जलील यांच्या मते, उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते की, “मला गर्व आहे की बाबरी मशीद पाडण्यामध्ये आमचे शिवसैनिक सर्वात पुढे होते.” या संदर्भात, इम्तियाज जलील यांनी मुस्लिम उमेदवारांना आणि मतदारांना आवाहन केले की, जर ते उद्धव ठाकरे यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून उभे राहिल्यास ते बाबरी मशीद विध्वंसाच्या गुन्ह्यात सामील होतील. अल्लाह त्यांना याबद्दल जाब विचारेल, असेही ते म्हणाले
Published on: Nov 26, 2025 11:21 AM
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी
