Imtiaz Jaleel : ठाकरे आजकाल खूप सेक्युलर, मुस्लमान म्हणतात ते चांगले, पण…. बाबरी मशीद मुद्द्यावरून जलील यांचा निशाणा
वाशिम नगर परिषद निवडणुकीच्या प्रचारसभेत इम्तियाज जलील यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. जलील यांनी उद्धव ठाकरेंच्या धर्मनिरपेक्ष भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, बाबरी मशीद विध्वंसात शिवसेनेच्या भूमिकेची आठवण करून दिली. मुस्लिम उमेदवारांनी ठाकरे यांच्यासोबत जाण्याबद्दल त्यांनी विचारणा केली. निवडणूक आयोगाकडून आपल्यावर पाळत ठेवल्याचा दावाही जलील यांनी यावेळी केला.
वाशिम नगर परिषद निवडणुकीच्या प्रचारसभेत एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर तीव्र शब्दांत हल्लाबोल केला. जलील यांनी उद्धव ठाकरे यांच्या धर्मनिरपेक्षतेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले की, “उद्धव ठाकरे आजकाल खूप सेक्युलर झाले आहेत.” जलील यांनी बाबरी मशीद विध्वंसाचा मुद्दा उपस्थित करत उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत केलेल्या एका विधानाचा उल्लेख केला.
जलील यांच्या मते, उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते की, “मला गर्व आहे की बाबरी मशीद पाडण्यामध्ये आमचे शिवसैनिक सर्वात पुढे होते.” या संदर्भात, इम्तियाज जलील यांनी मुस्लिम उमेदवारांना आणि मतदारांना आवाहन केले की, जर ते उद्धव ठाकरे यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून उभे राहिल्यास ते बाबरी मशीद विध्वंसाच्या गुन्ह्यात सामील होतील. अल्लाह त्यांना याबद्दल जाब विचारेल, असेही ते म्हणाले
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी

