मोठी घडामोड! केंद्र सरकारने थांबवली साखर निर्यात; भाव वाढीमागचं मोठं कारण काय?
देशातील वाढत्या साखर दरांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने मोठा निर्णय घेत साखर निर्यातीवर तात्काळ बंदी लागू केली आहे. देशांतर्गत बाजारात साखरेच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे केंद्र सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. ही बंदी 30 सप्टेंबर 2026 पर्यंत किंवा पुढील आदेश येईपर्यंत लागू राहणार असल्याची माहिती समोर आली आहे.
देशातील वाढत्या साखर दरांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने मोठा निर्णय घेत साखर निर्यातीवर तात्काळ बंदी लागू केली आहे. देशांतर्गत बाजारात साखरेच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे केंद्र सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. ही बंदी 30 सप्टेंबर 2026 पर्यंत किंवा पुढील आदेश येईपर्यंत लागू राहणार असल्याची माहिती समोर आली आहे.
भारत हा ब्राझीलनंतर जगातील दुसऱ्या क्रमांकाचा साखर उत्पादक देश मानला जातो. त्यामुळे केंद्र सरकारच्या या निर्णयाचा आंतरराष्ट्रीय साखर बाजारावरही मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जागतिक बाजारपेठेत साखरेच्या वाढत्या किमती आणि देशांतर्गत उपलब्धता लक्षात घेऊन सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, सरकारने स्पष्ट केले आहे की, ज्या साखर निर्यातीसंदर्भातील करारांवर यापूर्वीच स्वाक्षऱ्या झाल्या आहेत किंवा ज्या व्यवहारांची प्रक्रिया पूर्ण झाली आहे, त्या करारांनुसार साखर निर्यात केली जाणार आहे. मात्र, यापुढे नवीन निर्यात करारांना परवानगी दिली जाणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........

