AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Indrayani River Accident : इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; 20-25 जण वाहून गेल्याची भीती, 6 दगावले

Indrayani River Accident : इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; 20-25 जण वाहून गेल्याची भीती, 6 दगावले

| Updated on: Jun 15, 2025 | 4:42 PM
Share

Indrayani River Accident News : मावळ तालुक्यात इंद्रायणीवरील पूल वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यात 6 जणांचा वाहून गेल्याने मृत्यू झाला आहे.

पुण्याच्या मावळ तालुक्यातील कुंडमळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आमदार सुनील शेळके यांनी दिलेल्या माहितीनुसार या दुर्दैवी दुर्घटनेत 6 जणांचा मृत्यू झाला आहे. तसंच या घटनेत तब्बल 20 ते 25 जण वाहून गेले असल्याचीही माहिती समोर आली आहे. वाहून गेलेल्या नागरिक पर्यटकांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य हे युद्धपातळीवर सुरू झालं आहे.

आमदार सुनील शेळके यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज रविवार असल्याने मावळ तालुक्यातील कुंडमळा या ठिकाणी पर्यटकांनी गर्दी केली होती. पावसाळा असल्याने या ठिकाणी रोज अनेक पर्यटक भेट देतात. कुंडमळा ओलांडण्यासाठी येथील इंद्रायणी नदीवर एक पूल बांधलेला आहे. एकाचवेळी क्षमतेपेक्षा जास्त लोक या पुलावर उभे राहिल्याने हा पूल कोसळला असल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यामुळे हा पूल कोसळला. या दुर्घटनेत 6 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 20-25 लोक वाहून गेले आहे.

Published on: Jun 15, 2025 04:42 PM