उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील हे सरकार वाचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. आमदार फुटतील असं वाटत नव्हतं. पण जे घडलं ते घडलं. एकापाओठपाठ एक आमदार जात आहेत. ते कसं काय जात आहेत त्याचा अंदाज लागत नाहीये. पण उद्धव ठाकरे यांच्या जवळचे लोक जात असल्याने आश्चर्य वाटतंय. मग ते कशासाठी जात आहेत? एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देण्यासाठी जात आहेत की त्यांचं आणि इतर आमदारांचं मन परिवर्तन करण्यासाठी जात आहेत की आणखी काही कारणाने याची कल्पना नाही, असं जयंत पाटील म्हणाले.