कल्याणमध्ये जलवाहिनी फुटली, लाखो लिटर पाणी वाया, नागरिक त्रस्त
Kalyan News : कल्याणमधील आधारवाडी गणेश चौक परिसरामध्ये ही घटना घडलीये. जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी रस्त्यावर आल्याचं पाहायला मिळालं. पाहा व्हीडिओ...
कल्याण : कल्याणमध्ये जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेलं आहे. कल्याणमधील आधारवाडी गणेश चौक परिसरामध्ये ही घटना घडलीये. जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी रस्त्यावर आल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला. नागरिकांना पाण्यातून मार्ग काढत प्रवास करावा लागला आहे. स्थानिक नगरसेवक आणि पालिका अधिकारी घटनास्थळी धाव घेत जेसीपीच्या सहाय्याने पाण्याचा निचरा करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. ठाणे महापालिकेच्या स्टेम प्राधिकरणाची 1800 एम.एम व्यासाची ही जलवाहिनी आहे. व्हॉल लिकेज झाल्याने घटना घडल्याची माहिती समोर आली आहे.
Follow Us
Latest Videos
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........

