Kalyan : गेले तक्रार द्यायला अन् भिडले आपापसात, कोळसेवाडी पोलीस ठाण्यात राडा, नेमकं कारण काय?
कल्याणमधील कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी आलेल्या एकाच गटातील तरुणांमध्ये वाद झाला. तक्रारीचे श्रेय आपल्याला मिळावे यावरून तरुण एकमेकांना भिडले. या राड्याप्रकरणी संबंधित तरुणांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
कल्याण शहरातील कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी आलेल्या काही तरुणांनी गोंधळ घातला. एकाच गटातील हे तरुण पोलीस ठाण्यातच एकमेकांशी भिडले, ज्यामुळे काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. मिळालेल्या माहितीनुसार, दाखल करण्यात येणाऱ्या तक्रारीचे श्रेय आपल्यालाच मिळावे यावरून या तरुणांमध्ये वाद सुरू झाला. हा वाद इतका वाढला की त्याचे रूपांतर हाणामारीत झाले.
या घटनेमुळे पोलीस ठाण्यात उपस्थित इतर नागरिक आणि पोलिसांनाही काही काळ आश्चर्य वाटले. पोलीस कर्मचाऱ्यांनी तात्काळ मध्यस्थी करून परिस्थिती नियंत्रणात आणली. या राड्यामध्ये सहभागी असलेल्या तरुणांवर आता गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणाची अधिक चौकशी करत असून, यामागील नेमके कारण आणि अन्य तपशील तपासत आहेत. पोलीस ठाण्यासारख्या संवेदनशील ठिकाणी घडलेल्या या घटनेमुळे चर्चांना उधाण आले आहे.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?

