जरंडेश्वरचा हक्क शेतकऱ्यांना कधी मिळणार? शेतकऱ्यांना घेऊन सोमय्या ईडी ऑफिसात
सातारा जिल्ह्यातल्या कोरेगाव तालुक्यातील चिमणगाव येथील जरंडेश्वर सहकारी कारखान्याच्या आरोपाचे भूत पुन्हा एकदा भाजप (BJP) नेते किरीट सोमय्यांनी (Kirit Somaiya) गुरुवारी बाटलीतून बाहेर काढले आहे.
सातारा जिल्ह्यातल्या कोरेगाव तालुक्यातील चिमणगाव येथील जरंडेश्वर सहकारी कारखान्याच्या आरोपाचे भूत पुन्हा एकदा भाजप (BJP) नेते किरीट सोमय्यांनी (Kirit Somaiya) गुरुवारी बाटलीतून बाहेर काढले आहे. शेतकऱ्यांना जरंडेश्वरचा हक्क कधी मिळणार असे म्हणत सोमय्या थेट शेतकऱ्यांना घेऊनच ईडीच्या ऑफिसात आले. कारखान्यावरील हक्क अजित दादांनी (Ajit Pawar) सोडावा, कारखाना परत देण्यासाठी पवार कुटुंबाने मदत करावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
Latest Videos
Latest News