जनतेला वास्तव कळावं यासाठी कोर्लईला जातोय : किरीट सोमय्या
रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) आणि मनिषा वायकर यांनी कोर्लई मध्ये घेतलेल्या जमिनीवरील घरांची पाहणी करण्यास सोमय्या आज जाणार आहेत.
भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) हे आज रायगड जिल्ह्यातील कोर्लई गावात जाणार आहेत. महाराष्ट्राच्या जनतेला वास्तव समजून घ्यायचं आहे, असं म्हटलं आहे. रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) आणि मनिषा वायकर यांनी कोर्लई मध्ये घेतलेल्या जमिनीवरील घरांची पाहणी करण्यास सोमय्या आज जाणार आहेत. अन्वय नाईक (Anway Naik) यांच्याकडून रश्मी ठाकरे आणि मनिषा वायकर यांनी जमीन खरेदी केली होती.19 बंगले उद्धव ठाकरे आणि वायकर परिवाराचे आहेत. मी ज्यावेळी आधी कोर्लई येथे गेलो तेव्हा त्या सरपंच यांनी असाच विरोध केला होता. घरे आहेत की नाही ही वास्तविकता लोकांना जाणून घ्यायची आहे.ही घरे चोरीला गेली की वाहून गेली हे जनतेला जाणून घ्यायचे आहे, त्यासाठी कोर्लईला जाणार आहे, असं किरीट सोमय्या म्हणाले.
बापरे! गणेशमूर्ती घ्यायची म्हटलं की खिसा होणार खाली, किंमत तब्बल...
सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागी भाजपच्या नवनीत राणा दिसणार? सुनिल तटकरे
एकच खळबळ! अल्पवयीन मुलीची अवैधरित्या प्रसूती, परस्पर विकलं नवजात बाळ..
शिंदेंच्या शिवसेनेचा मविआला जबर धक्का, माघार घेणाऱ्या त्या नेत्याला मो

