‘शेतकऱ्यांचं मरण हेच सरकारचं धोरण’, सरकारविरोधात निघाला काँग्रेसचा मोर्चा
VIDEO | सरकारने शेतकाऱ्यांच्या मागण्या मान्य न केल्यास रस्त्यावर उतरणार, काँग्रेसने दिला सरकारला इशारा
बुलढाणा : शेतकऱ्यांच्या हक्काचा पिक विमा अद्यापही शेतकऱ्याला मिळालेला नाही, अवकाळी पाऊस आणि गारपीठ झाल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्याचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्यावी यासह इतर मागण्यांसाठी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप सानंदा यांनी मोर्चा काढला होता. काँग्रेस आयोजित केलेल्या महाविकास आघाडीचा मोर्चा खामगाव येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ‘शिंदे-मोदी शेतकरी विरोधी’, ‘शेतकऱ्यांचे मरण सरकारचे धोरण’ अशा लिहलेल्या टोप्या डोक्यात घालून जोरदार घोषणाबाजी करत सरकारचा निषेध केल्याचे पाहायला मिळाले. सरकारने मागण्या मान्य न केल्यास राज्यभर काँग्रेस रस्त्यावर उतरणार असल्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..

