“पोहरादेवीवर राजकारण नको”, महंत सुनील महाराज यांचं देवेंद्र फडणवीस यांना आवाहन
ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पोहरादेवीची खोटी शपथ घेतली, असा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपानंतर ठाकरे गट आक्रमक झाला आहे. ठाकरे गटाचे महंत सुनील महाराज यांनी देवेंद्र फडणवीस यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
वाशिम : ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पोहरादेवीची खोटी शपथ घेतली, असा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपानंतर ठाकरे गट आक्रमक झाला आहे. ठाकरे गटाचे महंतं सुनील महाराज यांनी देवेंद्र फडणवीस यांना प्रत्युत्तर दिलं आहे.ते म्हणाले की, “उद्धव ठाकरे हे आई, वडिलांनंतर कोणाला मानत असतील तर ते बंजारा समाजाची काशी असलेल्या पोहरादेवीला मानतात.पोहरादेवी हे श्रद्धेच स्थान आहे. येथे कोणीही खोटी शपथ घेत नाही. पोहरादेवीवर राजकारण करू नये व अपमान करू नये. उद्धव ठाकरे हे शब्दाला जगणारे नेते असून त्यांनी पोहरादेवी येथे येऊन दर्शन घेणार असल्याचं सांगितले होते. त्याच शब्दाला पाळत त्यांनी दर्शन घेतले.”
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद...
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी

