AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Flood Relief : पंजाबमध्ये हेक्टरी 50 हजार रूपयांची मदत, महाराष्ट्रातील बळीराजाला किती?

Maharashtra Flood Relief : पंजाबमध्ये हेक्टरी 50 हजार रूपयांची मदत, महाराष्ट्रातील बळीराजाला किती?

| Updated on: Sep 26, 2025 | 12:45 PM
Share

महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीनंतर, पंजाब सरकारने हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. यामुळे महाराष्ट्रातील शेतकरीही राज्य सरकारकडून याच धर्तीवर मदतीची अपेक्षा करत आहेत. पंजाबच्या तुलनेत महाराष्ट्रातील नुकसान अधिक असून, मदतीची मागणी जोर धरू लागली आहे.

महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. असंच नुकसान पंजाब राज्यात देखील पाहायला मिळालं. पंजाब सरकारने तेथील शेतकऱ्यांसाठी हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकरी देखील राज्य सरकारकडे अशाच मदतीची मागणी करत आहेत. पंजाब सरकारने एकरी २० हजार रुपये म्हणजेच हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत दिली आहे, तर महाराष्ट्र सरकारने आतापर्यंत प्रति हेक्टर ८५०० रुपयांची मदत दिली आहे. यासाठी २२१५ कोटींचा निधी जारी करण्यात आला आहे.

पंजाबच्या तुलनेत महाराष्ट्रातील परिस्थिती अधिक गंभीर आहे. पंजाबमध्ये ५ लाख एकरांवरील पिकांचे नुकसान झाले आहे, तर महाराष्ट्रात तब्बल ७० लाख एकरांवरील पिके वाया गेली आहेत. पंजाब सरकारने घरांच्या नुकसानीसाठी ४० हजार रुपये आणि पशुधनाच्या हानीसाठी प्रति जनावर ३७५०० रुपये मदत जाहीर केली आहे. शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, महाराष्ट्राला देखील पंजाबप्रमाणे हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत मिळावी. या संदर्भात, मुख्यमंत्री पाहणी दौऱ्यात म्हणाले की, निकष बाजूला ठेवून सरसकट मदत दिली जाईल.

Published on: Sep 26, 2025 12:45 PM