AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Eknath Shinde : महाविकास नाही तर महाकन्फ्यूज आघाडी अन् हा रडीचा डाव... शिंदेंचा मविआ शिष्टमंडळावर हल्लाबोल

Eknath Shinde : महाविकास नाही तर महाकन्फ्यूज आघाडी अन् हा रडीचा डाव… शिंदेंचा मविआ शिष्टमंडळावर हल्लाबोल

| Updated on: Oct 14, 2025 | 2:18 PM
Share

महायुतीच्या नेत्याने विरोधकांकडून निवडणूक आयोगाकडे करण्यात आलेल्या तक्रारींवर टीका केली आहे. विरोधकांचा हा रडीचा डाव असून, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील संभाव्य पराभवाच्या भीतीतून ते असे करत असल्याचे म्हटले आहे. महायुती विकासाच्या कामांच्या बळावर जनतेचा विश्वास जिंकून निवडणुकांमध्ये प्रचंड यश मिळवेल, असा विश्वास नेत्याने व्यक्त केला.

महायुतीमधील नेते एकनाथ शिंदे यांनी विरोधकांकडून निवडणूक आयोगाकडे करण्यात आलेल्या तक्रारींवर भाष्य करताना चांगलाच हल्लाबोल केला आहे. यावर प्रतिक्रिया देताना एकनाथ शिंदे यांनी विरोधकांच्या या कृतीला रडीचा डाव असे संबोधले. शिंदेंनी म्हटले की, महाविकास आघाडी ही महाकन्फ्यूज आघाडी असून, त्यांच्यात कोणताही समन्वय नाही. लोकसभा आणि विधानसभेतील महायुतीच्या यशानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही त्यांना पराभव दिसू लागला आहे. महायुती सरकारने शेतकऱ्यांसाठी केलेल्या भरीव मदतीमुळे आणि विकासकामांमुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे, असा दावाही शिंदेंनी केला आहे.

जेव्हा महाविकास आघाडीला विजय मिळाला, तेव्हा त्यांनी कधी तक्रारी केल्या नाहीत; मात्र पराभव दिसू लागला की, ते निवडणूक आयोग आणि न्यायालयांवरही आरोप करतात, असही शिंदेंनी म्हणत त्यांच्यावर निशाणा साधलाय. महाराष्ट्रातील जनता सुज्ञ असून, महायुती सरकारला पाठिंबा देईल आणि येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुती प्रचंड विजय मिळवेल, असा विश्वास नेत्याने व्यक्त केला.

Published on: Oct 14, 2025 02:14 PM