….तर उभ्या जिंदगीत आला नसेल असा पश्चाताप सरकारला येणार, जरांगे पाटील नेमकं काय म्हणाले?
'लेकरांच्या वेदना आणि त्रास होई नये, म्हणून समस्त मराठा संतप्त झाला आहे. हेच सरकारच्या लक्षात येत नाहीये. मराठा आरक्षणासाठी निघालेल्या या पायी यात्रेत लहान लेकरांपासून ते वयोवृद्धांपर्यंत रात्रं-दिवस सगळेच सहभागी झाले आहे. याचा अर्थ सरकारच्या लक्षात यायला हवा'
अहमदनगर, २२ जानेवारी २०२४ : मनोज जरांगे पाटील यांचा हा पायी मोर्चा अहमदनगरला भिंगार येथे पोहोचला आहे. मराठा आरक्षणासाठी मोठ्या ताकदेनं राज्यातील मराठा रस्त्यावर उतरला आहे. लेकरांच्या वेदना आणि त्रास होई नये, म्हणून समस्त मराठा संतप्त झाला आहे. हेच सरकारच्या लक्षात येत नाहीये. मराठा आरक्षणासाठी निघालेल्या या पायी यात्रेत लहान लेकरांपासून ते वयोवृद्धांपर्यंत रात्रं-दिवस सगळेच सहभागी झाले आहे. याचा अर्थ सरकारच्या लक्षात यायला हवा. परंतु सरकारच्या हे लक्षात येत नाही. ही सत्तेची रग अंगात आहे. त्यामुळे आम्ही काहीही करू, असे म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला फटकारलं आहे. पुढे ते असेही म्हणाले की, पूर्वीचा मराठा आता राहिला नाही. यावरून त्यांना कळायला हवं. ना पक्ष ना नेते या पलिकडे मराठा आपल्या मुलांसाठी काहीही करू शकतो. या मोर्च्यातील एकातरी मुलाला त्रास द्यायचा प्रयत्न सरकारने केला तर….असे म्हणत मनोज जरांगे पाटील यांना इशारा दिलाय.
Published on: Jan 22, 2024 05:43 PM
तुम्ही पाहिलंत का? फुटीर खासदाराकडून उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा
शिक्षण मंत्री पुन्हा बदलणार' बड्या नेत्याने थेट केला मोठा दावा...
NEET, नंतर आता MPSC? औषध निरीक्षक भरती परीक्षेचा पेपर फुटल्याचा दावा!
रायगड ते विदर्भ... राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
