आधी छगन भुजबळ यांच्यावर सडकून टीका, आता माघार; मनोज जरांगे पाटलांकडून ‘तो’ शब्द मागे
लायकी नसलेल्यांच्या हाताखाली काम करावं लागतंय, असं विधान मनोज जरांगे पाटील यांनी पुण्यातील खराडी येथील सभेत केले होते. मात्र आता याच वक्तव्यावरून मनोज जरांगे पाटील यांनी माघार घेतली आहे. लायकी या शब्दावरून छगन भुजबळ यांच्यावर केलेली टीका आणि तो शब्द मागे
मुंबई, २८ नोव्हेंबर २०२३ : गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे पाटील आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यात चांगलेच शाब्दिक वार होत असल्याचे पाहायला मिळत आहे. तर लायकी नसलेल्यांच्या हाताखाली काम करावं लागतंय, असं विधान मनोज जरांगे पाटील यांनी पुण्यातील खराडी येथील सभेत केले होते. मात्र आता याच वक्तव्यावरून मनोज जरांगे पाटील यांनी माघार घेतली आहे. लायकी या शब्दावरून छगन भुजबळ यांच्यावर केलेली टीका आणि तो शब्द जरांगे यांनी जाहीरपणे मागे घेतला असल्याचे त्यांनी म्हटले आहे. माध्यमांच्या प्रतिनिधीने मनोज जरांगे पाटील यांना ती टीका चुकीचं आहे असे वाटते का? असा सवाल केला असता मनोज जरांगे पाटील म्हणाले, तुम्ही सारखं ते लावून का धरलं मला माहिती नाही. पण मी माझे शब्द मागे घेतो, असे जरांगे पाटील म्हणाले.
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी

