“उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व कधीच सोडलंय”; भाजप खासदाराचा हल्लाबोल
‘इंडिया’ आघाडीची तिसरी बैठक ही मुंबईत होणार आहे. याचे यजमानपद शिवसेनेच्या ठाकरे गटाकडे आहे. तर शिवसेनेच्या ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे यांच्याकडे ‘इंडिया’ आघाडीचे नेतृत्व येईल असे बोलले जात आहे. यावरून भाजप खासदार मनोज कोटक यांनी टीका केली आहे.
मुंबई, 07 ऑगस्ट, 2023 | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपला रोखण्यासाठी सर्व विरोधक एकवटले आहेत. देशातील महत्वाच्या विरोधी पक्षांची ‘इंडिया’ आघाडीची तिसरी बैठक ही मुंबईत होणार आहे. याचे यजमानपद शिवसेनेच्या ठाकरे गटाकडे आहे. तर शिवसेनेच्या ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे यांच्याकडे ‘इंडिया’ आघाडीचे नेतृत्व येईल असे बोलले जात आहे. यावरून भाजप खासदार मनोज कोटक यांनी टीका केली आहे. ते म्हणाले की, “उद्धव ठाकरे यांनी पहिला आपला पक्ष सांभाळावा. मग इंडियाची बैठक घ्यावी.महाराष्ट्राच्या प्रश्नावर बोलावं. आज मुंबईकरांना सेवा मोदी देत आहेत. उद्धव ठाकरे यांनी कधीच हिंदुत्व सोडलं आहे.त्यामुळे त्यांचा काही हिंदुत्वाशी संबंध येत नाही. ”
Published on: Aug 07, 2023 10:39 AM
ठरलं तर मग! पुढचे 3 वर्षे हाच कार्यक्रम; शिवसेनेत... उद्धव ठाकरेंनी
शिंदेंनी शब्द पाळला! आणखी एका खासदाराला दिलं सर्वात मोठं गिफ्ट? तब्बल
पुन्हा पेपरफुटी! TET परीक्षेचा पेपर फुटला, पुन्हा परिक्षा कधी होणार?
इकडे उद्धव ठाकरेंचा दौरा अन् तिकडे एकनाथ शिंदेंचा मोठा डाव, काय घडलं?
