AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजपकडून मुस्कटदाबी होतेय का? या प्रश्नावर बच्चू कडू स्पष्टच बोलले, ‘शिवसेनेच्या आमदारांना....’

भाजपकडून मुस्कटदाबी होतेय का? या प्रश्नावर बच्चू कडू स्पष्टच बोलले, ‘शिवसेनेच्या आमदारांना….’

| Updated on: Jun 14, 2023 | 10:21 AM
Share

भाजपचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर वेळ देत नाहीत. आमची कामे करत नाहीत. उलट भाजपकडून शिंदे गटावर मोठा अन्याय सुरु असल्याचा आरोप शिवसेनेचे संपर्कप्रमुख संजय कोकाटेंनी केला होता. त्यानंतर आता यात युतीच्या घटक पक्षांची सुद्धा भर पडताना दिसत आहे.

अमरावती : गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि शिवसेना शिंदे गटात वाद सुरू आहे. शिवसेना व भाजपा मध्ये धुसफूस सुरु झाल्याचे पहायला मिळत आहे. भाजपचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर वेळ देत नाहीत. आमची कामे करत नाहीत. उलट भाजपकडून शिंदे गटावर मोठा अन्याय सुरु असल्याचा आरोप शिवसेनेचे संपर्कप्रमुख संजय कोकाटेंनी केला होता. त्यानंतर आता यात युतीच्या घटक पक्षांची सुद्धा भर पडताना दिसत आहे. प्रहारचे संघटनेचे नेते आणि आमदार बच्चू कडू यांनी देखील भाजपडून शिवसेनेच्या आमदारांना त्रास दिला जातोय असे म्हटलं आहे. ज्यामुळे आता एकच चर्चा होताना दिसत आहे. त्याचबरोबर त्यांनी, कालच्या जाहिरातीवरून शिंदे-फडणवीस यांच्यात मिठाचा खडा पडला असं बोललं जात असल्यावरही प्रतिक्रिया देताना असं मोठ्या नेत्यांमध्ये कधी होत नाही. कारण सत्ता. पण हे कार्यकर्त्यांमध्ये होतं असं म्हटलं आहे. तर भाजपणे शिंदे यांची कदर करावी असंही त्यांनी सुनावलं आहे.

Published on: Jun 14, 2023 10:21 AM