… मात्र शरद पवार यांच्यावर लक्ष ठेवा, राज ठाकरे यांचा इंडिया आघाडीला खोचक सल्ला काय?
इंडिया आघाडीवरून राज ठाकरे यांनी शरद पवार यांना टोला लगावला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आज आढावा बैठकीनंतर राज ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
मुंबई, १८ डिसेंबर २०२३ : इंडिआ आघाडीचा पॅसेज आता पूर्ण झाला आहे, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटले आहे. तर इंडिया आघाडीवर भाष्य करताना राज ठाकरे यांनी इंडिया आघाडीला उपरोधिक सल्लाही दिल्याचे पाहायला मिळाले. तुम्ही एकत्र रहा पण शरद पवार यांच्यावर लक्ष ठेवा, असं वक्तव्य राज ठाकरे यांनी केले आहे. यावेळी इंडिया आघाडीवरून राज ठाकरे यांनी शरद पवार यांना टोला लगावला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आज आढावा बैठकीनंतर राज ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. राज ठाकरे यांनी धारावीचा पुनर्विकासाचा प्रकल्प, मुंबई महापालिकेची निवडणूक या विषयावरही भाष्य केले आहे. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यासह इतर शिवसैनिकांनी काढलेल्या मोर्च्यावर बोलताना राज ठाकरे यांनी खोचक वक्तव्य करत सेटेलमेंट नीट होत नाही म्हणून हा मोर्चा काढल्याचे म्हटले आहे.
AQI 150 ते 190 दरम्यान, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईची मागणी!
राज्यसभेवर जाणाऱ्या पार्थ पवारांना सुप्रिया सुळे यांचा खास सल्ला
राज्यसभा निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता; सुप्रिया सुळे यांचे वक्तव्य
उद्धव नाही, आदित्य नाही, ठाकरे गटाचे निर्णय फक्त राऊतच घेतात

