Special Report | कर्नाटक निकालावरून राज ठाकरे आणि भाजप आमने-सामने, भाजपच्या पराभवावर काय दिला सल्ला?
VIDEO | कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांना काय दिला सल्ला
मुंबई : जनतेला गृहित धरलं की काय होतं, हेच सांगणारा कर्नाटकचा निकाल असल्याचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलं आणि भाजपवर जोरदार निशाणा साधला. या टीकेला प्रत्युत्तर देत भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले… आणि कर्नाटकाच्या निकाला नंतर पुन्हा ईव्हीएमचा मुद्दा पुन्हा चर्चेत आलाय. आमचं कोणीही काहीही बिघडवू शकत नाही, असे मानणाऱ्यांसाठी कर्नाटकाचा निकाल आणि पराभव महत्त्वाचा आहे. असं म्हणत राज ठाकरे यांनी भाजपवर टीका केली. तर गेल्या काही दिवसांपूर्वी बारसूला विरोध दर्शवत राज ठाकरेंनी भूमिका व्यक्त केली. यानंतर आता सत्ताधाऱ्यांनी जनतेला गृहित धरू नये, असा सल्ला दिला आहे. तर दुसरीकडे कर्नाटकात काँग्रेस जिंकली असली तर राष्ट्रवादीच्या जितेंद्र आव्हाड यांनी एव्हीएमवर शंका निर्माण केलीये. लोकांच्या मनात गैरसमज निर्माण होऊ नये म्हणून राज्यांऐवजी एव्हीएमचा वापर फक्त लोकसभेत होतो, असा दावाही त्यांनी केलाय. कर्नाटकात निवडणुकीदरम्यान काही लोकांचा एव्हीएमविरोधातील राग उफाळून आल्याचे पाहायला मिळत आहे त्याचे व्हिडीओही व्हायरल झाले. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट…
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

