मुंबईतील वडापाव विक्रेत्यांनी घेतली तुकाराम मुंढेंची धास्ती, असं काही केलं की…
एफडीआय आयुक्त तुकाराम मुंडे यांनी मुंबईतील वडापाव विक्रेत्यांसाठी स्वच्छता आणि खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेबाबत नवीन नियमावली जाहीर केली आहे. दादर येथील एका प्रसिद्ध वडापाव विक्रेत्याने या आदेशांचे पालन करण्यास सुरुवात केली असून, पांढऱ्या कागदाचा वापर, स्वच्छता आणि उत्तम तेलाचा वापर करत आहेत. ग्राहकही या बदलाचे स्वागत करत असून, याला आरोग्यासाठी महत्त्वाचे पाऊल मानत आहेत.
एफडीआय आयुक्त तुकाराम मुंडे यांनी मुंबईतील वडापाव विक्रेत्यांसाठी नवीन नियमावली जाहीर केली आहे. या नियमांमुळे वडापाव विक्रेत्यांमध्ये स्वच्छतेबाबत जागरूकता वाढली असून, अनेक स्टॉल्सनी बदल करण्यास सुरुवात केली आहे. दादर येथील प्रसिद्ध श्री स्वामी समर्थ वडापाव स्टॉलवर या आदेशांचे पालन होताना दिसत आहे.
या स्टॉलवरील विक्रेत्यांनी सांगितले की, त्यांनी आता वृत्तपत्राऐवजी चांगल्या गुणवत्तेचा पांढरा कागद वापरण्यास सुरुवात केली आहे. तसेच, काम करताना डोक्यावर कॅप घालणे, आजूबाजूला आणि गिऱ्हाईकांसाठी परिसर स्वच्छ ठेवणे आणि उत्तम दर्जाचे तेल वापरणे यासारख्या उपाययोजना केल्या जात आहेत. विक्रेत्यांच्या मते, तुकाराम मुंडे यांचा हा निर्णय अत्यंत चांगला आहे, कारण तो सर्वांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचा आहे. ग्राहकही या बदलाचे स्वागत करत आहेत. एका ग्राहकाने सांगितले की, यामुळे खाद्यपदार्थांची गुणवत्ता सुधारेल आणि आरोग्याच्या दृष्टीने हे एक क्रांतीकारी पाऊल आहे. मुंबईतील नागरिक या निर्णयामुळे समाधानी असून, संपूर्ण शहरात या नियमांचे पालन होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Published on: Aug 26, 2026 01:44 PM
मुंबईतील वडापाव विक्रेत्यांनी घेतली तुकाराम मुंढेंची धास्ती,
विशेष बातमी! मध्य रेल्वेवर शुक्रवारपासून सलग 15 दिवसांचा ब्लॉक, कारण..
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा मोठा निर्णय; FDA भरती परीक्षा रद्द
एकीकडे CM फडणवीसांच्या दिल्ली जाण्याच्या चर्चा, तर दुसरीकडे समर्थक...

