अजित पवार यांच्या ‘त्या’ वक्तव्याची जयंत पाटील यांच्याकडून पाठराखन
राष्ट्रवादी काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांची पाठराखन केली आहे. तर राज्यातील सरकारची स्थिती ही स्थिर असताना, ती नाही असं म्हणणं कितपत योग्य आहे. दादांनी तेच केलं
नागपूर : राज्याचे विरोधी पक्ष नेते आणि राष्ट्रवादी काँग्रसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी शिंदे-फडणवीस सरकार हे स्थिर असल्याचं वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावरून महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) काहीच ठीक नसल्याचे समोर येत असून एक वाक्यता नसल्याचे उघड होत आहे. यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी त्यांची पाठराखन केली आहे. तर राज्यातील सरकारची स्थिती ही स्थिर असताना, ती नाही असं म्हणणं कितपत योग्य आहे. दादांनी तेच केलं. आता त्यांच्याकडे 150 पेक्षा जास्त आमदार असतील तर असं म्हणणं योग्य आहे. आता सुप्रीम कोर्टाचा निकाल लागल्यानंतर काय होईल हे त्यावेळी बघू. तर खरं बोललं तरी शिक्षा या राज्यात होते असा टोला लगावला आहे.
पुणे पुन्हा हादरलं! त्या बॅनरवरून वाद; दोन गटांमध्ये गोळीबार
हाताच्या फोडाप्रमाणे जपलेलं पीक मातीमोल, शेतकऱ्यांना लाखोंचा फटका
सांगलीत अवकाळीचा हाहाकार, काढणीला आलेल्या पिकांचं मोठं नुकसान
अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान; भरपाईची मागणी

