राज ठाकरे यांच्या भाषणाला महाराष्ट्र किंमत देत नाही – जयंत पाटील
रविवारी झालेल्या सभेत राज ठाकरे यांनी शरद पवारांवर जोरदार टीका केली होती. राज ठाकरे यांच्या भाषणाला महाराष्ट्र काडीचीही किंमत देत नसल्याचे म्हणत जयंत पाटलांनी या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.
काल औरंगाबादमध्ये मनसे प्रमुख राज ठाकरे यांची सभा पार पडली. या सभेला तुफान गर्दी झाली होती. या सभेत राज ठाकरे यांनी शरद पवारांवर जोरदार टीका केली. आता या टीकेने राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. राज ठाकरे यांचे भाषण म्हणजे फक्त एंटरटेनमेंट असते. शरद पवारांवर टीका केल्याशिवाय सभेला कव्हरेज भेट नाही. राज ठाकरे यांच्या या भाषणाला महाराष्ट्र काडीचीही किंमत देत नसल्याची टीका पाटील यांनी केली आहे.
Latest Videos
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या..
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत...
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं

