राधाकृष्ण विखे पाटील विरोधकांवर संतपाले; म्हणाले, “मान्यता संपत चालल्या पक्षांनी मोदींविरोधात एकत्र…”
रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशाच्या नव्या संसद भवनाचं उद्घाटन करण्यात आलं. हे उद्घाटन वैदिक रिती रिवाजानुसार करण्यात आलं. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, आम आदमी पार्टी आणि तृणमूलसह 19 राजकीय पक्षांनी या सोहळ्यावर बहिष्कार टाकला होता. या पार्श्वभूमीवर राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विरोधकांवर टीका केली आहे.
अहमदनगर : रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशाच्या नव्या संसद भवनाचं उद्घाटन करण्यात आलं. हे उद्घाटन वैदिक रिती रिवाजानुसार करण्यात आलं. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, आम आदमी पार्टी आणि तृणमूलसह 19 राजकीय पक्षांनी या सोहळ्यावर बहिष्कार टाकला होता. या पार्श्वभूमीवर राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विरोधकांवर टीका केली आहे. “उद्धव ठाकरेंकडे पक्ष शिल्लक राहिला नाही.सत्तेसाठी त्यांनी हिंदुत्वाचे तत्व सोडले.राष्ट्रवादी काँग्रेसची राष्ट्रीय पक्षाची मान्यता निवडणूक आयोगाने काढून घेतली.मान्यता संपत चालल्या पक्षांनी मोदींविरोधात एकत्र येऊन काहीही फरक पडणार नाही. ही सत्तेसाठी द्वेषाने पछाडलेली मंडळी आहेत. देशातील जनता पंतप्रधान मोदी यांच्यासोबत आहे. त्यामुळे 2024 ला मागील रेकॉर्ड तोडून अधिक जागा जिंकत भाजप सत्तेत येणार, असं राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.
Published on: May 29, 2023 10:09 AM
सचिन अहेर यांची आमदारकी राहणार की जाणार? कायदा काय सांगतो? असीम सरोदें
महापौर रितू तावडे यांची दुर्घटना स्थळाला भेट, दोषींवर कारवाई करणार
केतन-सिया प्रकरणाला वेगळंच वळण; तब्बल 10 कोटी... वकिलांच्या दाव्याने
चेंबूर स्कुलबस अपघातानंतर शिंदे अॅक्शन मोडमध्ये, फोन करून दिला तातडीच
