अजित पवार अपघात प्रकरण: सरकारकडून अडथळे का आणले जाताय? राज ठाकरेंचा संतप्त सवाल
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अजित पवारांच्या निधनासंदर्भात एफआयआर नोंदवण्यातील सरकारी अडथळ्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. रोहित पवार यांनी तीन ठिकाणी प्रयत्न करूनही एफआयआर नोंदवला गेला नाही. यामुळे सरकारवर संशयाची सुई फिरत असून, या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी ठाकरे यांनी केली आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अजित पवारांच्या निधनासंदर्भात एफआयआर (FIR) नोंदवण्यातील सरकारी अडथळ्यांवर चिंता व्यक्त केली आहे. रोहित पवार यांनी या प्रकरणी एफआयआर नोंदवण्याचा प्रयत्न केला असता, त्यांना तीन पोलीस ठाण्यांमध्ये रोखण्यात आल्याचा दावा राज ठाकरे यांनी केला आहे. मरिन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवला जात असताना, डीसीपी (DCP) अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करून तो थांबवल्याचेही त्यांनी नमूद केले.
राज ठाकरे यांनी सरकारवर संशय निर्माण करत म्हटले आहे की, जर केवळ अपघात असेल, तर एफआयआर नोंदवण्यापासून अडथळे का आणले जात आहेत? त्यांच्या मते, सरकार स्वतःच संशयाला वाव देत आहे. उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांनीही या गंभीर बाबीचा विचार करावा, असे आवाहन त्यांनी केले. सामान्य नागरिकांना एफआयआर नोंदवण्यापासून रोखल्यास काय होईल, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.
सरकारकडून अडथळे का आणले जाताय? राज ठाकरेंचा संतप्त सवाल
आमच्यावर आणि भाजपवर आता बोलू नये! बावनकुळेंचा रोहित पवारांना सल्ला
तुमच्याही आयफोनवर व्हॉट्सॲप चालत नाहीय का? असेल हे कारण
दादांना कंट्रोल करता येत नव्हतं, काकींना..;रोहित पवारांचं मोठं वक्तव्य

