AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कावीळ झालेल्यांना जग पिवळं दिसतं, राज ठाकरे यांची कोणावर टीका?

कावीळ झालेल्यांना जग पिवळं दिसतं, राज ठाकरे यांची कोणावर टीका?

| Edited By: | Updated on: Apr 13, 2024 | 4:22 PM
Share

पंतप्रधान नरेंद्र मोदी नसते तर आज राम मंदिर झालेच नसते, त्याचबरोबर जम्मू काश्मीरमधील 370 कलम हटलेच नसते. असे राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली होती. त्या बैठकीनंतर राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन माध्यमांशी संवाद साधला आहे. बैठकीमध्ये राज ठाकरे यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना महायुतीला पाठिंबा देण्याचं सांगितलं आहे. त्याचसोबत महायुतीला पाठिंबा का दिला या प्रश्नाचं देखील राज ठाकरे यांनी उत्तर दिलं आहे. राज ठाकरे म्हणाले की, भूमिका बदलणं माझ्यासाठी आवश्यक होतं. पाच वर्षात राज्यातील परिस्थिती बदलली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी नसते तर राममंदीर उभं झालं नसतं. तसेच जम्मू काश्मीरमधील 370 कलम सारख्या गोष्टी घडल्या. त्यामुळे नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदासाठी पाठिंबा द्यावा असं पक्षानं ठरवलंय असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलं आहे

Published on: Apr 13, 2024 01:01 PM