काही मिळो ना मिळो आंदोलन करतच राहणार, राजू शेट्टी यांचा राष्ट्रवादीला इशारा
विधानपरिषदेच्या बारा जागांवरुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. विधानपरिषदेची जागा हे एक समझोता आहे. तो समझोता पाळायचा की नाही पाळायचा हे राष्ट्रवादी काँग्रेसनं ठरवायचं आहे.
विधानपरिषदेच्या बारा जागांवरुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. विधानपरिषदेची जागा हे एक समझोता आहे. तो समझोता पाळायचा की नाही पाळायचा हे राष्ट्रवादी काँग्रेसनं ठरवायचं आहे. काही मिळो न मिळो आंदोलन करत राहणार असल्याचं राजू शेट्टी म्हणाले. विधानपरिषेदची जागा हा मुद्दा गौण आहे. पूरग्रस्तांच्या मुद्यावरुन लक्ष विचलित करण्यासाठी विधानपरिषदेचा विषय पुढं आणला जातोय, असं राजू शेट्टी म्हणाले. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे राज्य सरकारनं गेल्या वर्षी विधानपरिषदेच्या बारा जागांसाठी नावांची शिफारस केली होती. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अद्याप नावांना मंजुरी देण्यात आलेली नाही. विधानपरिषदेसाठी नाव वगळण्यात आलंय की नाही, यासंदर्भात माहिती नाही, असंही राजू शेट्टी म्हणाले. राजू शेट्टी यांनी पूरग्रस्तांच्या मागणीसाठी पंचगंगा परीक्रमा आयोजित करण्यात आलं आहे.
Published on: Sep 04, 2021 01:00 PM
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी

