AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

RSS Mohan Bhagwat : अमेरिकेच्या टॅरिफचा जगभरात फटका, स्वदेशी आणि स्वावलंबनावर मोहन भागवतांचं मोठं वक्तव्य

RSS Mohan Bhagwat : अमेरिकेच्या टॅरिफचा जगभरात फटका, स्वदेशी आणि स्वावलंबनावर मोहन भागवतांचं मोठं वक्तव्य

| Updated on: Oct 02, 2025 | 10:48 AM
Share

मोहन भागवत यांनी अमेरिकेच्या टॅरिफ धोरणाचे जागतिक परिणाम, स्वदेशी आणि स्वावलंबनाची आवश्यकता अधोरेखित केली. हिमालयावरील पर्यावरणीय बदलांवर चिंता व्यक्त करत त्यांनी शेजारील देशांतील अशांतता भारतासाठी काळजीचा विषय असल्याचे सांगितले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी दसरा मेळाव्यात अमेरिकेच्या नवीन टॅरिफ धोरणाचे जागतिक परिणाम आणि भारताच्या आत्मनिर्भरतेची गरज यावर प्रकाश टाकला. जागतिक जीवन परस्परावलंबनावर आधारित असले तरी, हे अवलंबित्व सक्तीचे होऊ नये, असे ते म्हणाले. स्वदेशी आणि स्वावलंबनानेच मजबुरी टाळता येईल. त्यांनी हिमालयाच्या क्षेत्रातील वाढत्या पर्यावरणीय समस्यांवरही चिंता व्यक्त केली, ज्यात अनियमित पाऊस, भूस्खलन आणि हिमनद्या कोरड्या पडण्याचा समावेश आहे. ही परिस्थिती पुनर्विचाराची गरज दर्शवते.

भागवत यांनी श्रीलंका, बांगलादेश आणि नेपाळसारख्या शेजारील देशांमधील राजकीय अशांततेवरही भाष्य केले. प्रशासनाचा जनतेशी असलेला संबंध आणि धोरणांची संवेदनशीलता यावर भर दिला. हिंसक आंदोलने किंवा क्रांती ही उद्दिष्टे साध्य करत नाहीत, असे त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ग्रामर ऑफ अनार्कीचा संदर्भ देत स्पष्ट केले. शांततापूर्ण आणि लोकशाही मार्गानेच खरा बदल घडू शकतो, असे मत त्यांनी मांडले.

Published on: Oct 02, 2025 10:48 AM