Indian Army : भारताकडे आता रशियाची S-500 मिसाईल सिस्टीम, S-400 पेक्षा खतरनाक, जाणून घ्या वैशिष्ट्य अन् बरंच काही
भारत आणि पाकिस्तानमधील सुरू असलेल्या तणावादरम्यान, भारतीय हवाई संरक्षण यंत्रणेने पाकिस्तानचे सर्व हल्ले उधळून लावले. त्यानंतर आता भारताची ताकद आणखी वाढली आहे कारण एस-५०० क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली खरेदी केली आहे.
भारत आणि पाकिस्तानमधील सुरू असलेल्या तणावादरम्यान भारताच्या हवाई संरक्षण यंत्रणेने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. पाकिस्तानकडून येणारे सर्व ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा हल्ला भारताने वाटेतच उधळला. पाकिस्तानच्या सर्व प्रयत्नांनंतरही, भारताच्या हवाई संरक्षण यंत्रणेला पराभूत करण्यात ते अपयशी ठरले. रशियाच्या S-400 ने भारताच्या मजबूत हवाई संरक्षण प्रणालीमध्ये खूप महत्त्वाची भूमिका बजावली आहे, ज्याने पाकिस्तानच्या दिशेने सोडलेले तुर्की आणि चिनी ड्रोन हवेत पाडले. S-400 चे यश पाहून रशियाने आता भारताला S-500 मिसाईल सिस्टीम दिली आहे. अशा परिस्थितीत, S-500 हे S-400 पेक्षा किती जास्त शक्तिशाली आणि खतरनाक असल्याचे सांगितले जात आहे.
भारताकडे असलेल्या S-400 हवाई संरक्षण प्रणालीपेक्षा S-500 संरक्षण प्रणाली खूपच शक्तिशाली आहे. S-500 ही एक अवकाश-संरक्षण सक्षम प्रणाली आहे आणि ती मल्टीलेयर्ड आणि मल्टी टार्गेट देखील आहे. ही अशी एक संरक्षण प्रणाली आहे जी अंतराळातही संरक्षण करू शकते, त्यात अनेक स्तर असल्याने जे एकाच वेळी अनेक लक्ष्यांना टार्गेट करू शकतात. ते शत्रूची लढाऊ विमाने, क्रूझ क्षेपणास्त्रे, हायपरसॉनिक क्षेपणास्त्रे तसेच पृथ्वीच्या कमी कक्षेत असलेले त्याचे गुप्तचर उपग्रह पाडू शकते. जमिनीवरून या हवाई संरक्षण यंत्रणेची मारा क्षमता सुमारे 200 किलोमीटर असल्याचे सांगितले जाते. याशिवाय, ही जगातील एकमेव हवाई संरक्षण प्रणाली आहे, ज्याची रेंज 600 किलोमीटर आहे आणि ती त्या रेंजमध्ये मॅक-20 च्या वेगाने एकाच वेळी 10 लक्ष्यांना इंटरसेप्ट करू शकते.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

