या सरकारला सळो की पळो करुन सोडू
रयत क्रांती संघटना आणि भारतीय जनता पक्ष किसान मोर्चातर्फे विरोध करुन सरकारला सळो की पळो करुन सोडू असा इशारा सदाभाऊ खोत यांनी दिला आहे.
ऊस उत्पादक शेतकऱ्यांना महावसुल सरकारकडून लूट होत असल्याची टीका सदाभाऊ खोत यांनी करत सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. देशात एफआरपीचा कायदा असतानाही या सरकारने एफआरपी दोन हफ्त्यात देण्याचा निर्णय घेऊन कायदा पायदळी तुडविण्याचे काम केले आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दोन हफ्त्यात एफआरपी देण्यात आल्याने शेतकऱ्यांचे कोट्यवधीचे नुकसान झाले आहे. सरकारच्या या निर्णयामुळे साखर सम्राट तुपाशी आणि शेतकरी उपाशी अशी राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था झाली आहे. त्यामुळे रयत क्रांती संघटना आणि भारतीय जनता पक्ष किसान मोर्चातर्फे विरोध करुन सरकारला सळो की पळो करुन सोडू असा इशारा सदाभाऊ खोत यांनी दिला आहे.
Follow Us
Latest Videos
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या नातलगाने...
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं...
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर...
भर मंचावरून जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीर...

