AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Human-Leopard Conflict : संगमनेरमध्ये बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांविरोधात जनआक्रोश, नागरिकांच्या मागण्या नेमक्या काय?

Human-Leopard Conflict : संगमनेरमध्ये बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांविरोधात जनआक्रोश, नागरिकांच्या मागण्या नेमक्या काय?

| Updated on: Dec 15, 2025 | 3:16 PM
Share

संगमनेरमध्ये बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांविरोधात तीव्र जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. आमदार सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखाली, नागरिकांनी बिबट्यामुक्त संगमनेरची मागणी केली. बिबट्यांची नसबंदी, पिंजऱ्यांची वाढ आणि नरभक्षक बिबट्यांना ठार मारण्यासह वनविभागाच्या नियोजनशून्यतेवर आंदोलकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

संगमनेर येथे बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे संतप्त नागरिकांनी “बिबट्यामुक्त संगमनेर” संदेश देत जनआक्रोश मोर्चा काढला. मानव-बिबट्या संघर्षामुळे नागरिकांना रस्त्यावर उतरावे लागले आहे. आमदार सत्यजित तांबे, माजी आमदार सुधीर तांबे आणि बिबट्याच्या हल्ल्यात बळी पडलेल्या कुटुंबीयांसह शेकडो नागरिक या मोर्चात सहभागी झाले होते. दिवसेंदिवस बिबट्यांची संख्या वाढत असून, ते मानवी वस्त्यांमध्ये, विशेषतः ऊसाच्या शेतात, प्रवेश करून लहान मुले आणि शेतात काम करणाऱ्या महिलांवर हल्ला करत आहेत. या हल्ल्यांमुळे अनेक निष्पाप जीवांना आपले प्राण गमवावे लागले आहेत, ज्यात एका सहा वर्षांच्या चिमुकलीचाही समावेश आहे. आंदोलकांनी मृतांना न्याय आणि बिबट्यांच्या वाढत्या धोक्यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. सत्यजित तांबे यांनी बिबट्यांची प्रायोगिक तत्त्वावर नसबंदी, पिंजऱ्यांची संख्या वाढवणे, नरभक्षक बिबट्यांना ठार मारण्याचे आदेश देणे, शेतकऱ्यांना स्वसंरक्षणासाठी कायद्याचे संरक्षण आणि बंदुकीचे परवाने देण्याची मागणी केली. वनविभागाचे नियोजन पूर्णपणे कोलमडले असून, त्यांना बिबट्यांच्या व्यवस्थापनात अपयश आल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

Published on: Dec 15, 2025 03:16 PM