AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तेव्हा त्यांनी तोंड का उघडलं नाही? राऊतांची पंतप्रधान मोदींच्या मणिपूर दौऱ्यावर टीका

तेव्हा त्यांनी तोंड का उघडलं नाही? राऊतांची पंतप्रधान मोदींच्या मणिपूर दौऱ्यावर टीका

| Updated on: Sep 13, 2025 | 10:24 AM
Share

शिवसेना नेते संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मणिपूर दौऱ्यातील विलंबावर तीव्र निषेध व्यक्त केला आहे. मणिपूरमधील हिंसाचाराबाबत मोदी सरकारच्या प्रतिक्रियेवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. शिवसेना भारत-पाक क्रिकेट सामन्याचा निषेध करण्यासाठी आंदोलन करणार असल्याचेही राऊत यांनी जाहीर केले आहे.

शिवसेना नेते संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मणिपूर दौऱ्यावर तीव्र टीका केली आहे. त्यांनी मणिपूरमध्ये घडलेल्या हिंसाचाराकडे केंद्र सरकारने गांभीर्याने पाहिले नाही असा आरोप केला. मणिपूरमध्ये महिलांवर झालेल्या अत्याचाराची आणि तरुणांच्या मृत्युची घटना घडताना पंतप्रधान मौन होते असा आरोप राऊत यांनी केला. त्यांनी या घटनेला मोठ्या प्रमाणावर निषेध व्यक्त करत शिवसेनेकडून भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्याचा निषेध करण्याचे आवाहन केले आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली दुपारी १२ वाजता या विषयावर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला जाईल असेही राऊत यांनी म्हटले आहे. “माझं कुंकू माझा देश, मेरा सिंदूर मेरा देश” या अभियानाद्वारे हजारो महिला नरेंद्र मोदींना मणिपूरच्या हिंसाचाराची आठवण करून देतील असेही त्यांनी सांगितले.

Published on: Sep 13, 2025 10:24 AM