संतोष बांगर यांचा ठाकरे गटाच्या नेत्यांवर गंभीर आरोप, म्हणाले, “माझ्याकडून पाच तोळ्याची सोन्याची चैन…”
शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी ठाकरे गटाच्या नेत्यांवर गंभीर आरोप केले.संतोष बांगर हे नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असतात.शनिवारी पुन्हा बांगर आपल्या वक्तव्याने चर्चेत आले.
नांदेड : शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी ठाकरे गटाच्या नेत्यांवर गंभीर आरोप केले.संतोष बांगर हे नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असतात. शनिवारी पुन्हा बांगर आपल्या वक्तव्याने चर्चेत आले.”जिल्हाप्रमुख पद पुन्हा पाहिजे असेल तर विनायक राऊत यांना 5 तोळ्याची चैन द्यावी लागले, तर विनायक राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आलं होतं. त्याचं बक्षीस देखील मी दिले असल्याचा आरोप बांगर यांनी केला आहे.तर जेवणाचे पैसे सुद्धा मीच दिले होते. त्यामुळे बबन थोरात यांना नांदेडला पाय ठेऊ देऊ नका, खासदारकीला देखील बबन थोरात यांनी फक्त पैसे गोळा करण्याचे काम केले असल्याचा आरोप बांगर यांनी केले. बांगर हे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत नांदेड येथे आयोजित मेळाव्यात बोलत होते. विनायक राऊत आणि बबन थोरात यांनी शिवसेनेची वाट लावली, असे देखील बांगर यावेळी म्हणाले.खासदार विनायक राऊत आणि बबन थोरात यांच्यावर आरोप करताना आमदार बांगर यांनी दोन्ही नेत्यांचा एकेरी उल्लेख करत आरोप केले.
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून...
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट...
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत
