Latur Water Crisis : पाणीबाणी! लातूरमध्ये पाण्यासाठी नागरिकांची वणवण भटकंती
Latur Water Crisis News : लातूर जिल्ह्यात पाण्यासाठी गावकऱ्यांना वणवण करत भटकण्याची वेळ आलेली असल्याचं चित्र सध्या बघायला मिळत आहे.
लातूर जिल्ह्यात पाण्यासाठी गावकऱ्यांना वणवण करत भटकण्याची वेळ आलेली असल्याचं चित्र सध्या बघायला मिळत आहे. हंडाभर पाण्यासाठी महिलांना रोज दूरदूरपर्यंत पायपीट करावी लागत आहे. एकीकडे लातूर जिल्ह्यात टँकरने पाणीपुरवठा केला जात नसल्याचं प्रशासन सांगत असताना लातूरच्या ग्रामीण भागात मात्र पाण्याची भीषण टंचाई बघायला मिळत आहे. लातूरच्या महादेववाडीमध्ये विहिरी कोरड्या पडलेल्या आहेत. पाण्याचे सगळे स्त्रोत आटलेले आहेत. त्यामुळे नागरिकांना पाण्याच्या शोधत वणवण भटकावं लागत आहे. या गावात प्रशासनाने घेतलेले बोअर देखील आता कोरडे पडलेले आहेत.
Published on: Apr 22, 2025 04:26 PM
Follow Us
Latest Videos
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....

