चार खांद्यावरून नेताना आम्हीही… जितेंद्र आव्हाड यांच्यानंतर अमोल कोल्हे यांचं प्रभू श्रीरामावर भाष्य
'राम राम म्हणून आम्हाला जोडणारा देश हवाय, असं शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे म्हणाले. पुढे ते असेही म्हणाले, प्रभू श्रीरामाविषयी जेव्हा आम्हाला शिकवलं जातं, तेव्हा एकवचनी, एकबाणी, एकपत्नी असल्याचे सांगितले जाते. तिसऱ्या विषयावर मी जाहीर बोलणार नाही,' अमोल कोल्हेंचं शिबीरातून रामावर भाष्य
शिर्डी, ४ जानेवारी २०२४ : प्रभू श्रीरामचंद्र जेवढे तुमचे आहेत, तेवढेच आमचे आहेत. चार खांद्यावरून नेताना आम्हीही ‘जय राम श्री राम, जय जय राम’ म्हणतो. पण आमच्या मंदिरात असणारे श्रीरामचंद्र हे धनुष्यबाण ताणलेले नाहीत तर ते आशीर्वादाचा हात उंचावलेले, माता सीतामाई, लक्ष्मण आणि हनुमान यांच्यासह कुटुंबवत्सल प्रभू श्रीरामचंद्र आहेत. आम्ही माणसाला माणूस भेटला की राम राम म्हणतो. राम राम म्हटल्याने माणूस जोडला जातो. राम राम म्हणून आम्हाला जोडणारा देश हवाय, असं शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे म्हणाले. पुढे ते असेही म्हणाले, प्रभू श्रीरामाविषयी जेव्हा आम्हाला शिकवलं जातं, तेव्हा एकवचनी, एकबाणी, एकपत्नी असल्याचे सांगितले जाते. तिसऱ्या विषयावर मी जाहीर बोलणार नाही, असं वक्तव्य करत अमोल कोल्हे यांनी नाव न घेता विरोधकांवर हल्लाबोल केला. तर निवडणुकीच्या आधी वचनं द्यायची आणि मग ‘चुनावी जुमला’ असल्याचं सांगून टाळायचं, अशांना प्रभू श्रीराम कसे पावतील? असा सवाल करत अमोल कोल्हे यांनी विरोधकांवर खोचक टीकाही केली आहे. ते शिर्डीतील शरद पवार गटाच्या शिबीरात बोलत होते.
Published on: Jan 04, 2024 04:28 PM
रेश्मा काळे नॉट रिचेबल नाहीत; उद्याच माघार घेणार? महाजनांचा मोठा काय?
गोंदियाला वादळी पावसाचा दणका! उकाड्यापासून दिलासा, पण धान उत्पादक.....
नेस्को ड्रग्ज प्रकरणात मोठा ट्विस्ट! आता आरोपींना हायकोर्टाकडून जामीन
वृद्धाला मारहाण करणाऱ्या कॅब चालकाच्या अडचणीत वाढ, परवाना होणार रद्द
