AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

'रेड्याप्रमाणे लोकशाही कशी कापली जाते, हे त्यांच्या,'...काय म्हणाले उद्धव ठाकरे ?

‘रेड्याप्रमाणे लोकशाही कशी कापली जाते, हे त्यांच्या,’…काय म्हणाले उद्धव ठाकरे ?

| Updated on: Mar 21, 2026 | 2:51 PM
Share

23 जानेवारीपासून बाळासाहेब ठाकरे यांचं जन्मशताब्दी वर्ष सुरू झाले आहे. इथल्या भूमिपूत्रांसाठी शिवसेना एक पाऊल पुढे टाकत असून शिवसेना भवनात राज्यातील पोर्ट, एअरपोर्टसाठी कौशल्याचे प्रशिक्षण वर्ग सुरु करत असल्याचे शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

गावोगावी असे भोंदू बाबा असतील आणि त्यांच्याकडे भोंदू भक्त जात असतील त्यांच्यावर कारवाई करायला हवी अशी मागणी शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी केली आहे. ते पुढे म्हणाले की आणखी किती खालच्या पातळीवर महाराष्ट्र नेणार आहोत. महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलन आणि जादू टोणा विरोधी कायदा आहे. कायद्याचे पालन करणारेच भोंदू बाबाच्या नादी लागणार असतील तर त्यांच्या भोंदू भक्तांवर कारवाई झाली पाहिजे.आम्ही लॉजिस्टिकच्या माध्यमातून महाराष्ट्र पुढे नेत आहोत. पण तुम्ही लिंबाच्या लागवडीवर आलात. त्याला टाचण्या मारणं आमचं काम नाही असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. सातारा येथे मंत्री शंभुराज देसाई यांना पोलिसांनी धक्काबुक्की केल्याचे उघडकीस आले आहे. त्यावर प्रतिक्रीया विचारता उद्धव ठाकरे म्हणाले की आता त्यांच्या लक्षात येईल की रेड्या प्रमाणे लोकशाही देखील कापली जाते.

Published on: Mar 21, 2026 02:51 PM
Follow Us