Pandharpur Breaking | पंढरपुरात आषाढी वारी दरम्यान संचारबंदी लागणार? पोलिसांचा जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव
कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं यंदा मोजक्या वारकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आषाढी वारी पार पाडण्याचा निर्णय़ घेतला आहे. मानाच्या दहा पालख्या एसटीद्वारे पंढरपूरला नेण्यात येणार आहेत.
पंढरपूर: कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं यंदा मोजक्या वारकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आषाढी वारी पार पाडण्याचा निर्णय़ घेतला आहे. मानाच्या दहा पालख्या एसटीद्वारे पंढरपूरला नेण्यात येणार आहेत. आषाढी वारीच्या दरम्यानच्या काळात पंढरपुरात संचार बंदी लागू करण्यात येईल, अशी शक्यता आहे. 17 जुलै पासून 25 जुलै पर्यंत संचारबंदी लावण्याबाबत पोलीस प्रशासनानं सोलापूरचे जिल्हाधिकारी यांना प्रस्ताव सादर केला आहे. जिल्हाधिकारी या बाबत अंतिम निर्णय घेणार आहेत.कोरोना चा संसर्ग असताना कमी वारकरी घेऊन वारी करा असा सरकार चा आग्रह असताना, आळंदी संस्थान ने प्रस्थान सोहळ्याला ही १०० पेक्षा अधिक लोकांना परवानगी देण्याची मागणी केली आहे.
CM विजय यांनी तडकाफडकी घेतला सर्वात मोठा निर्णय! या नेत्याला 24 तासांत
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार.....
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड.....

