कोकणात जाताय? दिवा-रत्नागिरी पॅसेंजरच्या वेळेत झालाय बदल
मध्य आणि कोकण रेल्वेच्या दुहेरीकरणामुळे दिवा-पॅसेंजरच्या प्रवासवेळेत घट झाल्याने मध्य रेल्वेने वेळापत्रकात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई : आता परिक्षांचा हंगाम संपत आला असून सुट्ट्यांची सुगी सुरू होईल. अनेक चाकरमाने हे उन्हाळी सुट्टीनिमित्त सहकुटुंब कोकणाकडे जातील. अशा वेळी जे दिवा-रत्नागिरी पॅसेंजरमधून जे प्रवास करतात त्यांच्यासाठी खास बातमी आहे. दिवा-रत्नागिरी पॅसेंजरच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. आता दिवा-रत्नागिरी पॅसेंजर सायंकाळी ५.५० वाजता रवाना होणार असून, रात्री १२.३० वाजता रत्नागिरी स्थानकात पोहोचणार आहे. मध्य आणि कोकण रेल्वेच्या दुहेरीकरणामुळे दिवा-पॅसेंजरच्या प्रवासवेळेत घट झाल्याने मध्य रेल्वेने वेळापत्रकात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या ही पॅसेंजर दुपारी ३.२० मिनिटांनी रवाना होते व रत्नागिरी स्थानकात रात्री १२.३० वाजता पोहोचते.
Published on: Mar 15, 2023 08:39 AM
कुत्रे भुंकतात… वाघ शिकार करतो! शिंदेंचा ठाकरेंवर थेट हल्लाबोल!
हिम्मत असेल तर समोर या! शिंदेंचं ठाकरेंना थेट खुलं आव्हान
माझ्यावरील आरोप खरे असतील तर पक्षप्रमुख पद सोडायला तयार...
ऑपरेशन टायगर नंतर; आधी ऑपरेशन कमळ करावं लागेल, ठाकरेंचा मोठा इशारा
