कोकणात जाताय? दिवा-रत्नागिरी पॅसेंजरच्या वेळेत झालाय बदल
मध्य आणि कोकण रेल्वेच्या दुहेरीकरणामुळे दिवा-पॅसेंजरच्या प्रवासवेळेत घट झाल्याने मध्य रेल्वेने वेळापत्रकात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई : आता परिक्षांचा हंगाम संपत आला असून सुट्ट्यांची सुगी सुरू होईल. अनेक चाकरमाने हे उन्हाळी सुट्टीनिमित्त सहकुटुंब कोकणाकडे जातील. अशा वेळी जे दिवा-रत्नागिरी पॅसेंजरमधून जे प्रवास करतात त्यांच्यासाठी खास बातमी आहे. दिवा-रत्नागिरी पॅसेंजरच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. आता दिवा-रत्नागिरी पॅसेंजर सायंकाळी ५.५० वाजता रवाना होणार असून, रात्री १२.३० वाजता रत्नागिरी स्थानकात पोहोचणार आहे. मध्य आणि कोकण रेल्वेच्या दुहेरीकरणामुळे दिवा-पॅसेंजरच्या प्रवासवेळेत घट झाल्याने मध्य रेल्वेने वेळापत्रकात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या ही पॅसेंजर दुपारी ३.२० मिनिटांनी रवाना होते व रत्नागिरी स्थानकात रात्री १२.३० वाजता पोहोचते.
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा

