AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pahalgam Terror Attack : '..पाकिस्तानातून आले होते, तुम्हाला कसे समजले?' स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींचा हल्लाबोल

Pahalgam Terror Attack : ‘..पाकिस्तानातून आले होते, तुम्हाला कसे समजले?’ स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींचा हल्लाबोल

| Updated on: Apr 27, 2025 | 4:03 PM

Swami Avimukteshwaranand on Sindhu treaty : भारताने सिंधु पाणी करार स्थगित करण्याचा निर्णय पहलगाम हल्ल्यानंतर घेतला आहे. त्यावर आता स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

सिंधु करार स्थगित केला, पण पाणी रोखण्याची व्यवस्था आहे का? असा सवाल सिंधु पाणी करार स्थगितीवर स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी उपस्थित केला आहे. पाणी रोखण्यासाठी आता काम सुरू केलं तर 20 वर्ष लागतील, असंही त्यांनी म्हंटलं आहे. यावेळी बोलताना स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती म्हणाले की, ‘पाकिस्तानला आपण धडा शिकवू…पण पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी पाकिस्तानातून आले होते की नाही, तुम्हाला कसे समजले? हे तुम्हाला इतक्या लवकर कसे कळले?, घटनेपूर्वी हे का कळले नाही? जर दहशतवादी पाकिस्तानातून आले असतील तर त्यांच्यावर कठोर कारवाई करा. आपल्या घरात एखादी घटना घडल्यास आपण सगळ्यात आधी कोणाला धरणार? सर्वात आधी तर चौकीदाराला पकडणार ना? त्याला विचारणार तू कुठे होतास? तू असताना ही घटना घडली कशी? तुला कशासाठी ठेवलंय? पण इथे तसं होताना दिसत नाही. इथे स्वत:ला चौकीदार म्हणवून घेतात. पण चौकीदारी नीट केली असती, असा हल्लाबोलही शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी केला.

दरम्यान, यावर आता नारायण राणे यांनी त्यावर उलटवार केला आहे. मी स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा आदर करतो. पण प्रत्येक निर्णयावर त्यांनी भाष्य करू नये, असं राणे यांनी म्हंटलं आहे.

Published on: Apr 27, 2025 04:02 PM