Pahalgam Terror Attack : ‘..पाकिस्तानातून आले होते, तुम्हाला कसे समजले?’ स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींचा हल्लाबोल
Swami Avimukteshwaranand on Sindhu treaty : भारताने सिंधु पाणी करार स्थगित करण्याचा निर्णय पहलगाम हल्ल्यानंतर घेतला आहे. त्यावर आता स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
सिंधु करार स्थगित केला, पण पाणी रोखण्याची व्यवस्था आहे का? असा सवाल सिंधु पाणी करार स्थगितीवर स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी उपस्थित केला आहे. पाणी रोखण्यासाठी आता काम सुरू केलं तर 20 वर्ष लागतील, असंही त्यांनी म्हंटलं आहे. यावेळी बोलताना स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती म्हणाले की, ‘पाकिस्तानला आपण धडा शिकवू…पण पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी पाकिस्तानातून आले होते की नाही, तुम्हाला कसे समजले? हे तुम्हाला इतक्या लवकर कसे कळले?, घटनेपूर्वी हे का कळले नाही? जर दहशतवादी पाकिस्तानातून आले असतील तर त्यांच्यावर कठोर कारवाई करा. आपल्या घरात एखादी घटना घडल्यास आपण सगळ्यात आधी कोणाला धरणार? सर्वात आधी तर चौकीदाराला पकडणार ना? त्याला विचारणार तू कुठे होतास? तू असताना ही घटना घडली कशी? तुला कशासाठी ठेवलंय? पण इथे तसं होताना दिसत नाही. इथे स्वत:ला चौकीदार म्हणवून घेतात. पण चौकीदारी नीट केली असती, असा हल्लाबोलही शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी केला.
दरम्यान, यावर आता नारायण राणे यांनी त्यावर उलटवार केला आहे. मी स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा आदर करतो. पण प्रत्येक निर्णयावर त्यांनी भाष्य करू नये, असं राणे यांनी म्हंटलं आहे.

हेच ते बंकर, जमिनीपासून 15 फूट खोल, जिथून भारतीय सैन्याची शत्रूवर नजर

स्वतःची इभ्रत स्वतः राखली पाहिजे; आंबेडकरांचा सरन्यायाधीशांना सल्ला

पंढरपूर मंदिर समितीकडून भाविकांचा अपमान, विठुरायाचे हार कचऱ्यात अन्...

भारताचं पहिलं शिष्टमंडळ आज UAE दौऱ्यावर,सिंदूरबाबत कोण मांडणार भूमिका?
