Pahalgam Terror Attack : व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट
Pahalgam Terror Attack Updates : पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे या परिसरातील पर्यटन व्यवसाय आता ठप्प झाला आहे. जम्मू काश्मीरसह पहलगामचं अर्थचक्र हे पर्यटनावर अवलंबून आहे. त्यामुळे आता इथलं जनजीवन विस्कळीत झालेलं आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर जम्मू काश्मीरमधील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालेलं आहे. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात अतिरेक्यांनी 26 पर्यटकांची निर्घृणपणे हत्या केलेली होती. त्यांनंतर भारत पाकिस्तानमध्ये एकीकडे तणाव वाढला आहे. तर दुसरीकडे पर्यटकांनी काश्मीरमधून काढता पाय घेतलेला आहे. जम्मू काश्मीरमधल्या पहलगामकडे पर्यटकांनी पाठ फिरवल्याने तेथील जनजीवन मात्र पूर्णपणे विस्कळीत झालं आहे. या ठिकाणी पर्यटन हे एकच उत्पादनाचं साधन आहे. संपूर्ण अर्थचक्र हे या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांवर सुरू असतं. पण आता पर्यटकांनी जम्मू काश्मीरकडे पाठ फिरवल्याने पहलगाममधील व्यापार ठप्प झालेला आहे. यामुळे अनेक लहानमोठ्या उद्योजकांचं नुकसान होतं आहे. अनेकांना आपलं घर आता कसं चालणार याची चिंता भेडसावत असल्याचं चित्र या ठिकाणी बघायला मिळत आहे.

मुंडेंना घेऊन अजितदादा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला; काय झाली चर्चा?

नाशिकमध्ये अवकाळीचा कहर; भाजीपाला सडला, शेतकरी हवालदिल

हेच ते बंकर, जमिनीपासून 15 फूट खोल, जिथून भारतीय सैन्याची शत्रूवर नजर

स्वतःची इभ्रत स्वतः राखली पाहिजे; आंबेडकरांचा सरन्यायाधीशांना सल्ला
