AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजपच्या चवन्न्या आणि ‘बावन’ आण्यांना इतका थयथयाट करण्याचे कारण काय?; सामनातून टीका

भाजपच्या चवन्न्या आणि ‘बावन’ आण्यांना इतका थयथयाट करण्याचे कारण काय?; सामनातून टीका

| Updated on: Apr 06, 2023 | 10:23 AM
Share

फडणवीस यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना महाराष्ट्राला नपुंसक बनवणाऱ्याना फडतूस नाही तर काय म्हणायचे? असा सवाल केला आहे

मुंबई : ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्तीला मारहाण झाल्यानंतर भाजप, शिंदे गट आणि ठाकरे गटात जोरदार लागली आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्धव ठाकरे यांनी फडतूस म्हटल्यानंतर फडणवीस यांनी मी फडतूस नाही तर काडतुस असल्याचे म्हटलं होतं. त्यावरून सामानाच्या अग्रलेखातून जहरी टीका करण्यात आली आहे. तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा देखील समाचार घेण्यात आला आहे. फडणवीस यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना महाराष्ट्राला नपुंसक बनवणाऱ्याना फडतूस नाही तर काय म्हणायचे? असा सवाल केला आहे. तर चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वकतव्यांचा समाचार घेताना, महाराष्ट्राचे सरकार ‘नपुंसक’ आहे म्हणजेच बिनकामाचे आहे, असे जर सर्वोच्च न्यायालय म्हणत आहे, तर मग भाजपच्या चवन्न्या आणि ‘बावन’ आण्यांना इतका थयथयाट करण्याचे कारण काय? ‘नपुंसक’ किंवा ‘फडतूस’ शब्दांचा अर्थ या ‘बावन’ आण्यांनी समजून घेतला पाहिजे.

Published on: Apr 06, 2023 09:37 AM